Saturday, November 22, 2014

आपली माणसं परखी होतात तेव्हा...!!

आपली माणसं परखी होतात तेव्हा...!!

कुणाला कितीही आपण
आपलं मानलं तरीही,
शेवटी ते परखेच ठरतात.....

स्वतः करत राहतात चुका,
दोश मात्र दुस-यांना देतात.....
स्वतःच्या स्वार्थासाठी,
आपला वापर करतात.....

किती कठोर मनाची असतात माणसे,
दुस-यांच्या दुःखाचा आनंद साजरा करतात....
.
कितीही आपलं माना त्यांना,
शेवटी ते मतलबीच ठरतात.....
खोट्या प्रेमाचा आव आणुन,
दुस-यांच्या भावनेशी मनसोक्त खेळतात.....
अगोदर जिवाला जीव देण्याची भाषा करुन,
शेवटी आपला जीव घेऊन निघून जातात.....
कितीही कठोर असली तरी अशी माणसे,
आयुष्यात शेवटी नेहमी आठवत राहतात.....


No comments:

Post a Comment